
अवतीभोवती कोणीच नसेल,
काळाकुट्ट काळोख असेल!
पायापुढची वाटसुद्धा दिसणार नाही,
'ओ'द्यायला कोणीसुद्धा असणार नाही!
प्रत्येक पाउल हरलेले,
जग उलट फिरले!
शरण न जाण्याची
हीच वेळ असते;
आपले आपण असण्याची
हीच वेळ असते!
अशा वेळी छातीवरती
ठेवा आपला हात,
''भिऊ नको!मी आहे!''
म्हणेल कोणी आत!
No comments:
Post a Comment